Ajay Mishra :अजय मिश्रांच्या मस्तवाल वागणुकीवर टीका, एबीपी नेटवर्कच्या पत्रकाराला धमकावलं ABP MAJHA

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप असणारे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा पुन्हा एकदा वादात अडकलेत...  अजय मिश्रा यांनी एबीपी नेटवर्कच्या पत्रकाराला धमकावलं...  इतकंच नाही पत्रकाराचा मोबाईल खेचून कॅमेरे बंद केले...  अजय मिश्रा यांनी पत्रकाराला “डोकं फिरलं आहे का?,” असे शब्द वापरले... मंत्र्य़ाच्या अशा वागणुकीवर आणि त्यांच्या मस्तवाल वागणुकीवर आता राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत...दरम्यान एवढ्या ड्राम्यानंतरही मिश्रा यांना हटवलं जाणार नसल्याचं सूत्रांकडून कळतंय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola