मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. मराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी केली आहे. मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकेल. तसेच मराठा समाजाचा न्याय हक्क मिळवून देताना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचा आरोग्य आराखाडा तयार झालेला आहे. देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे ज्या राज्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचे टास्क फोर्स निर्माण केले आहे.