Bihar Election Results 2020 |अपेक्षित यश न मिळाल्याने भाजप कार्यकर्ते माघारी,अद्याप निकाल प्रतीक्षेत

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार कोरोना संकटामुळे रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू राहणार आहे. कोरोनामुळे मतमोजणीचे नियम बदलण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत सांगितले की मतमोजणी दरम्यान कोरोनाचा प्रोटोकॉल पाळला गेला आहे. मोजणी सभागृहात 14 ऐवजी केवळ सात टेबल आहेत. सरासरी 35 फेऱ्यामध्ये मतांची मोजणी केली जाईल. रात्री उशिरापर्यंत निकाल येऊ शकतात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola