Aurangabad Lockdown : औरंगाबाद शहरात 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता प्रशासनाने पूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. 30 मार्चच्या मध्यरात्रीपासून आठ एप्रिल मध्यरात्रीपर्यंत म्हणजे संपूर्ण 10 दिवसांसाठी हे लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाउन काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाबी बंद राहणार आहेत. राज्यातील महानगरातील औरंगाबाद पहिलं शहर आहे. ज्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन होणार आहे.
अगदी किराणा मालाचे दुकान, दूध हे सुद्धा दुपारी बारावाजेपर्यंत उपलब्ध असतील आणि त्यानंतर पूर्णतः बंदी असेल. नागरिकांनी घराबाहेर पडायचं नाही अथवा गुन्हे दाखल होणार अशा पद्धतीचा इशारा प्रशासनाने दिला आहे. औरंगाबादमध्ये दिवसाला अठराशे रुग्णांची नोंद होत आहे. औरंगाबादेत अंशतः लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर प्रशासनाने कठोर निर्णय घेतलेला आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. महत्त्वाचं म्हणजे उद्योगांना या लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे.