Rajya Sabha Election 2022 : उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे Aurangabad चे आमदार उद्या मुंबईत येणार
abp majha web team
Updated at:
07 Jun 2022 11:57 AM (IST)
राज्यसभेसाठीचं मतदान दोन दिवसांवर आलंय... त्यामुळे सर्वपक्षीय आमदारांना मुंबईत सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी धडपड सुरू आहे... मात्र शिवसेनेचे औरंगाबादमधले सात आमदार उद्या संध्याकाळी मुंबईत येणार आहेत.... उद्या उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा आहे... या सभेनंतर सर्व आमदारांना मुंबईत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केलेली आहे... या सर्व आमदारांना मुंबईत आणण्याची जबाबदारी मंत्री सुभाष देसाईंकडे देण्यात आलेय.