
Aurangabad: लसीचा दुसरा डोस घेतला नसेल तर 500 रु दंड! ABP Majha
Continues below advertisement
औरंगाबादमध्ये दुसरा डोस किंवा एकही डोस घेतला नसल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. औरंगाबाद पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडे यांनी हे आदेश दिलेत. उद्यापासून ही कारवाई करण्यात येणार आहे. औरंगाबादमध्ये २ लाख ११ हजार नागरिकांनी लशीचा एकही डोस घेतलेला नाही. तर लसीकरणाची मुदत संपल्यानंतरही ६७ हजार नागरिकांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही.
त्यामुळे ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना लसीकरण वाढवण्यासाठी औरंगाबादच्या प्रशासकांनी हा निर्णय घेतलाय.
Continues below advertisement
Tags :
Aurangabad Action Order Administrator Second Dose Omicron Danger Five Hundred Rupees Fine Astikkumar Pandey . Tomorrow