Aaditya Thackeray : गर्दी पाहून मुख्यमंत्र्यांना फोन येईल,औरंगाबादच्या गर्दीवर आदित्य ठाकरेंना चिंता

काल औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंना आता बाबा ओरडतील की काय अशी चिंता लागलीय. कारण औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरेंना भेटण्यासाठी चौकाचौकात गर्दी होत होती. या गर्दीमुळे अनेक ठिकाणी कोरोना नियमांचाही विसर पडलेला दिसून आला. कार्यकर्त्यांचा हा उत्साह पाहून आदित्य ठाकरेंना नक्कीच आनंद झाला असेलच पण गर्दी टाळा असं राज्याला आवाहन करणारे बाबा आपल्याला ओरडतील अशी भीतीही वाटली असणारच आणि हीच भीती त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना बोलून दाखवली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola