#KanganaRanaut मुंबई पोलिसांवर विश्वास नसेल तर मुंबईत राहायचा प्रश्नच नाही, अनिल परब यांनी कंगनाला सुनावलं!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Sep 2020 08:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमागील काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर टीका केली जात आहे. 26 ऑगस्ट रोजी कंगना रणौत हिने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आपल्याकडे काही पुरावे असल्याचं ट्वीट केलं होतं. आता या प्रकरणात सीबीआय चौकशी करत आहे. तर तिने ते पुरावे सीबीआयकडे सुपूर्त करावेत , असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हंटलं आहे.