Diwali नंतर महागाईचा आणखी एक झटका? तूरडाळ महागण्याची शक्यता,उत्पादन ३ लाख टनाने घटल्याचा फटका?

अकोला- नवीन तूरदाळ दिवाळीनंतर बाजारात येण्यासाठी सज्ज झाली आहे. पण, यावर्षी देशभरात तूर डाळीचे उत्पादन ३ लाख टन कमी होण्याची शक्यता आहे. यातील सर्वाधिक पिक महाराष्ट्रात आहे. यावर्षी देशभरात ४६ लाख हेक्टरवर तुरीचे पीक घेण्यात आला आहे. लागवडी व उत्पादनाचा विचार केला तर त्यामध्ये तब्बल ७ ते ८ टक्के घट आहे. यामुळे मागील वर्षीच्या ४३ लाख टनाऐवजी यंदा ३९.५० लाख टन इतके उत्पादन होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम तुरीच्या भावावर होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात तज्ञ आणि व्यापाऱ्यांशी बोलून बातमी करता येईल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola