Ajit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?

Ajit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?

बीड ते बारामती तसं अंतर 200 पा50 किलोमीटर सुद्धा नाही पण मुंडे पवार संघर्षामुळे अनेक वर्ष राजकीय दरी कायम वाढतीच राहिली आणि बारामती विरोध हाच इथल्या राजकारणाचा घाबा राहिला. त्याच बीड जिल्ह्यात अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून आज एंट्री घेतली आणि पहिल्याच बैठकीत बीडच्या प्रगतीच्या मार्गात अनेक दशक अडसर बनलेली गुंडागिरी, खंडणीखोरी, दादागिरी संपवण्याचे संकेत दिले. अजित पवारांच्या विकासाच्या दादागिरीचा पहिला अंक बीडच्या डीपीडीसी बैठकीत पाहायला मिळाला. ही नवी दादागिरी बीडची. सजेदार असली पाहिजे, त्याच्यामध्ये जर वेळे वाटले प्रकार झाले तर मी सहन करणार नाही, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, जवळचा, लांबचा असं काही. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा मागास का राहिला? याच इथले विजन नसलेले लोकप्रतिनिधी हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण. मराठवाड्याच्या विकासासाठी कानमंत्र देतानाच अजित दादांनी खंडणीखोरांना खरमरीत इशारा दिलाय. आपल शहर आहे. स्वच्छ ठेवा, आपल्या आपली प्रतिमा जनमाणसामध्ये चांगली ठेवा, चुकीच्या प्रवृत्तीची लोकं आपल्या आजोबाजूला अजिबात राहता कामा नये. त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्या. उद्याच्याला कुठल्या बाबतीमध्ये मला जर कळलं तर मी पोलिसांना आताच तिथं सांगणार आहे. राजकीय हस्तक्षेप पोलीस लोक करत असताना मी होऊन देणार नाही. महायुतीच्या कुणाच्याकडनच होऊन देणार नाही. हे सगळं अजित दादा कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत असले तरी त्यांच्या बाजूलाच उभे असलेले धनंजय मुंडे कान देऊन लक्षपूर्वक ऐकत आहे. एकीकडे धनंजय मुंडेंचे अप्रत्यक्ष कान टोचताना अजित दादांनी त्यांच्या विरोधकांनाही धक्का दिला. वाल्मीक कराडवरून मुंडें विरोधात आघाडी उघडणाऱ्या सुरेश ढस आणि प्रकाश सोळंके यांना जिल्हा नियोजन सदस्य समिती. केलेले आरोप, संदीप शिरसागरांनी केलेले आरोप, सुरेश धसांनी केलेले आरोप, त्यानंतर नमिता मुंदडानी केलेले आरोप, सोलंकी जींनी केलेले आरोप हे सगळे जे आहेत हे स्थानिक आमदार आणि खासदार बीडचे, या सगळ्यांनी गेल्या 50 दिवसात केलेले आरोप प्रत्यारोप आहेत, माझी अपेक्षा आहे की ह्याच्यात महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याची नोंद घेऊन महाराष्ट्राला न्याय द्यावा. ही मी मागणी एक लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्रातले एक नागरिक म्हणून आज ही मागणी करते कारण का आज तिती योगायोगाने तिथली डीपीडीसी आहे. गेली काही दशक बीड जिल्ह्यात पवार विरुद्ध मुंडे असा संघर्ष पाहायला मिळाला. त्यातही गोपीनाथ मुंडेंमुळे इथल्या राजकारणाचा गाभा बारामती विरोधी राहिला आहे. त्याच बारामतीच्या अजित पवारांकडे आता पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याचा कारभार आलाय. यापेक्षा मोठा योगायोग काय असेल?

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola