नालासोपारा : वीज, बाजारपेठा, दुकानं बंद; पावसामुळे जनजीवन विस्कळीत
Continues below advertisement
वसई-विरार आणि नालासोपाऱ्यात पाऊस थांबलेला असला तरी इथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. कारण, अऩेक भागात अजूनही पाणी साचून आहे. 24 तासांपासून लाईट नाही, बाजारपेठा, रिक्षा, टॅक्सी सर्व काही बंद आहे. त्यामुळे खासकरुन बॅचलर तरुण-तरुणींची खाण्या-पिण्याची मोठी गैरसोय होतेय. लाईट नसल्याने मोबाईल बंद आहेत. त्यामुळे अनेकांचा संपर्कही होऊ शकत नाही. सोसायट्यांमधल्या मोटर बंद पडल्याने अनेकांना तळमजल्यावरुन पाणी भरावं लागतं आहे.
Continues below advertisement