Bihar Election Results 2020 | निवडणूक आयोग म्हणजे भाजप आयोग, काँग्रेसच्या उदित राज यांचा गंभीर आरोप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार कोरोना संकटामुळे रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू राहणार आहे. कोरोनामुळे मतमोजणीचे नियम बदलण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत सांगितले की मतमोजणी दरम्यान कोरोनाचा प्रोटोकॉल पाळला गेला आहे. मोजणी सभागृहात 14 ऐवजी केवळ सात टेबल आहेत. सरासरी 35 फेऱ्यामध्ये मतांची मोजणी केली जाईल. रात्री उशिरापर्यंत निकाल येऊ शकतात.