Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
तर नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकांनंतर आता महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली. निवडून येणाऱ्या उमेदवारांकडून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. शहरामध्ये नेमक्या कोणत्या समस्या आहेत, राजकीय समीकरण नेमकी कशी आहेत याबाबत धुळ्यातल्या पत्रकारांशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधींनी. महापालिकेच्या निवडणुकांच्या चर्चांना आता सुरुवात झाली आणि ठीकठिकाणी देखील चर्चा आता रंगू लागल्यात. सर्वसामान्यांच्या अपेक्षा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आता समाजाचा तिसरा डोळा असणारे. पत्रकार आहेत, स्थानिक पत्रकार जे आहेत, त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत, काय झालं पाहिजे या विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. सर काय सांगाल, काय वाटत नेमकं की महानगरपालिकेच्या निवडणुका होतायत, कसं बघता या निवडणुकांकडे आणि काय अपेक्षा आहेत तुमच्या? नाही, धुळे महानगरच्या संदर्भामधल्या ज्या काही नागरिक समस्या आहेत, सुविधा आहेत या संदर्भात अपेक्षांच म्हटलं तर खूप मोठ्या अपेक्षा आहेत. कारण गेली अनेक वर्ष ज्या वेगवेगळ्या पक्षांनी आणि गटांनी सत्ता भोगली महापालिकेची एकाला. या धुळेकरांच्या अपेक्षा आणि त्यांच्या गरजा पूर्ण करता आलेल्या नाही. या शहराचा जिव्हाळ्याचा विषय पिण्याच्या पाण्याचा राहिलेला आहे. अनेकांनी अनेक निवडणुकांमध्ये आश्वासन दिले की आम्ही किमान रोज नव्हे तर एक दिवस तरी पाणी देऊ. आजपर्यंत एकाही पक्षाला रोज किंवा एक दिवस आड पाणी देणे शक्य झालेलं नाहीये. या एका मुद्द्यावर अनेक निवडणुका लढवल्या गेल्यात. रस्त्यांचा विषय संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला आहे की या शहरामध्ये एक एक रस्ता चार-चार वेळा बनवला गेला. तरीही आज रस्ते. चालण्या योग्य नाहीयत किंवा गटारींचा भुयारी गटारींचा विषय असेल किंवा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीचा विषय असेल कायमच सगळे विषय या ठिकाणी वादग्रस्त राहिलेत. मुद्दा विकास कामांचा असेल तर हजारो कोटी रुपये या शहरात आल्याचा दावा वेगवेगळ्या पक्षांनी आणि गटांनी केला आहे. याच मुद्द्यांच्या आधारावर विधानसभा निवडणूक लढवली गेली काही हजार कोटी या शहरात आले असं सांगितलं गेलं परंतु तेवढे हजार कोटी रुपयांची काम या शहरात दिसत नाही त्यामुळे धुळेकरांच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत आणि राहिला प्रश्न निवडणुकी. तर निवडणुकीमध्ये लोकशाहीत लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, संख्या वाढली पाहिजे. यावेळेस इच्छुकांची संख्या खूप जास्त आहे. चुरसही जास्त आहे, चुरस राहिली की लोकशाही जिवंत ठेवता येते. त्यामुळे यावेळेस इच्छुकांमध्ये अनेक असे आहेत की ज्यांना वेगवेगळे वलय आहे, वेगवेगळ्या पार्श्वभूमी आहेत, वादग्रस्त पार्श्वभूमी आहेत. यातले किती लोकांना किंवा किती इच्छुकांना प्रभावी राजकीय पक्ष उमेदवारी देईल हा सुद्धा येत्या काळामध्ये दिसणारा प्रश्न आहे.