Exclusive | मी रिटायर झालोय! मीच का सरपंच राहायचं? बाकीच्यांनाही संधी मिळावी - भास्कर पेरे पाटील
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Maharashtra Gram Panchayat Elections 2021 : राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या 14 हजार गावांमध्ये राजकीय धुरळा उडणार आहे. या निवडणुकांसाठी गावागावात जोरदार प्रचार सुरुय. मात्र यावेळी राज्यातील तीन चर्चित गावात देखील निवडणूक होत असल्यानं या गावांच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. मागच्या तीस वर्षापासून बिनविरोध निवडणूक होत असलेल्या हिवरेबाजारमध्ये पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे तर अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीमध्ये सुद्धा ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे आणि भास्कर पेरे पाटील यांच्या पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीत आता पेरे पाटील नसणार आहेत.