Devendra Fadnavis Pune PC | पदवीधर निवडणुकीत भाजपच बाजी मारणार, देवेंद्र फडणवीसांना विश्वास
आपल्या भाषणात फडणवीस यांनी या तीन पक्षांच्या सरकारवर टीका करताना बिहारच्या निकालांनी यांचा फुगा फुटल्याचे सांगितले. जे वातावरण बिहारसह अन्य राज्यात आहे, तेच महाराष्ट्रात असून देश फक्त मोदींवर विश्वास ठेवत असल्याचा टोला लगावला .
यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी बोलताना जर तुम्ही भाजपच्या नेत्यांवर बोललं तर तुम्हालाही जशास तसे उत्तर मिळेल, मग पुन्हा गोपीचंदच्या नावाने ओरडू नका असा इशारा राष्ट्रवादी आणि इतरांना दिला. यावेळी लक्षण ढोबळे, मुन्ना महाडिक, सुभाष देशमुख यांनीही राज्य सरकारवर जोरदार टोलेबाजी केली.