NAAC Colleges : राज्यातील 'या' महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही
Continues below advertisement
राज्यातील 60 टक्के महाविद्यालयांवर सर्वात मोठं संकट आलंय... 60 टक्के महाविद्यालयांचं नॅक मूल्यांकन झालंच नसल्याचं समोर आलंय... आणि त्यामुळे आता या महाविद्यालयाच्या अडचणी वाढणार आहेत... नॅक मूल्यांकन न झालेल्या महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत मूल्यांकन पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे ... मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण न केल्यास येत्या 2023-24 शैक्षणिक वर्षासाठी या महाविद्यालयांना नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही असं उच्च शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलय..
Continues below advertisement