बारावी निकालाचा फॉर्म्युला ठरला, राज्य बारावी परीक्षेच्या निकालासाठी सीबीएसई पॅटर्नचा वापर

मुंबई : राज्यातील बारावीच्या परीक्षेच्या निकालाचा फॉर्म्युला अखेर ठरलाय. बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्यात येणार आहे.  सीबीएसई प्रमाणेचं हा फॉर्म्युला  असणार आहे. दहावीसाठी 30 टक्के, अकरावीसाठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के या सूत्रानुसार विभागणी करण्यात आली आहे.  त्यामुळं बारावी निकाल जाहीर करण्यासाठी महाविद्यायांना या शासन निर्णयाचा आधार घ्यावा लागणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola