Anvay Naik Death Case | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण मागील सरकारने दाबलं, कुटुंबियांचा आरोप

मुंबई : मनसुख हिरण मृत्यू प्रकरण विधीमंडळात गाजल्यानंतर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणदेखील पुन्हा चर्चेत आलं होतं. अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांनी आज पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षाच्या भूमिकेवर टीका केली. मागील सरकारने वडिलांचं (अन्वय नाईक) आत्महत्या प्रकरण दाबलं असल्याचा पुन्हा आरोप केला. तर माझ्या पतीच्या आत्महत्येचं प्रकरण बाजूला राहिलं विरोधक त्यांच्या जमीन व्यवहारांवर चर्चा करत आहेत, असं अक्षता नाईक यांनी म्हटलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola