अनोळखी मेसेज, कॉलला उत्तर देताय? सावधान! नाही तर कष्टाची कमाई गुन्हेगारांच्या हातात!
हल्ली सायबर फ्रॉडच प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल आहे. दिवसेंदिवस सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत चालली आहे पण ज्यांच्या सोबत हे सायबर भामटे फ्रॉड करतात त्या कुटुंबावर त्याचा काय परीणाम होतो. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं मुंबई मध्ये राहणाऱ्या महेश गुप्ता यांना जर त्यांचे सायबर फ्रॉड मुळे गमावलेले पैसे परत मिळाले नसते तर त्यांच्यावर अक्षरश रस्त्यावर येण्याची वेळ आली असती. इतकंच नाही तर त्यांच कुटुंब ही त्यांना गमवाव लागलं असत..