मित्रांनीच मित्राच्या भावंडांचा घात केल्याचा संशय,जळगाव बोरखेडा हत्याकांड प्रकरणातील धक्कादायक बातमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजळगाव : चार अल्पवयीन बालकांची कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा गावात घडली आहे. बोरखेडा शेत शिवारात भिलाला नावाचं सालं दारी करणार कुटुंब राहतं. दोन मुलं आणि दोन मुली असलेली चार भावंड घरी ठेऊन भिलाला दाम्पत्य गावाला गेले असता, रात्रीच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्याने या चारही जणांची कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या केली. या हत्येमागील कारणाचा आणि आरोपींचा तपास पोलीस करत आहेत.