Mumbai Local | लोकल प्रवासात म.रेल्वेवर 40 टक्के तर प.रेल्वेवर 45 टक्के महिलांच्या छळवणूकीच्या तक्रारी | ABP Majha

मुंबई लोकलमधून जाताना सुरक्षित वाटत नसल्याच्या तक्रारी अनेकदा प्रवाशांनी केल्या आहेत. आणि त्यालाच अधोरेखित करणारा अहवाल मुंबई रेल्वे विकास महामंडळ या खाजगी संस्थेनं दिलाय.
MRVC या संस्थेच्या सर्वेक्षणाअंतर्गत पश्चिम रेल्वेच्या विरार ते डहाणूदरम्यान ४५ टक्के आणि मध्य रेल्वेच्या नेरळ ते कर्जतदरम्यान ४० टक्के महिलांनी आपली छळवणूक होत असल्याचं सांगितलंय.
उभ्यानंच प्रवास, प्रचंड गर्दी, फेरीवाले यांसारख्या समस्या भेडसावत असल्याच्या तक्रारी महिलांनी केल्यात.
यामध्ये ६० टक्के महिला रेल्वे पोलिसांकडे तर केवळ १३ टक्के महिला हेल्पलाईनचा आधार घेत असल्याचं म्हटलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola