औरंगाबाद : औरंगाबादेतील हिंसाचार पूर्वनियोजित असण्याची शक्यता, पोलिसांना संशय
Continues below advertisement
औरंगाबादचा हिंसाचार पूर्वनियोजित असू शकतो असा अहवाल पोलिसांनी डीजीपी ऑफिसला दिला असल्याची माहिती डीजीपी ऑफिसमधील सूत्रांनी दिलीय... काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये दोन गटांत छोटीमोठी धूसफूस सुरु असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. त्यामुळे हा कट पूर्वनियोजित असल्याची शक्यता जास्त आहे असं पोलिस सूत्रांचं म्हणणं आहे. औरंगाबाद हिंसाचारप्रकरणी कालच शिवसेनेच्या लच्छू पैलवान याला अटक करण्यात आली आहे.
Continues below advertisement