औरंगाबाद : मराठवाड्यात 7 लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना
मराठवाड्यात मागील दोन महिन्यांत खरीप हंगामातील केवळ 35.2 टक्के पाऊस पडला आहे. 41 लाख 80 हजार 800 हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. पेरणीचा हंगाम संपला असून, अजूनही 7 लाख 30 हजार 99 हेक्टर क्षेत्रात पेरणीच झाली नाही. बीड जिल्ह्याने मागील पंधरवड्यात सर्वाधिक 93.35 टक्के पेरणी झाली आहे.