712 | नवी दिल्ली | काँग्रेस नेतृत्त्वाखाली जंतर-मंतरवर शेतकऱ्यांचा मोर्चा

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली जंतर-मंतरवर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये अखिल भारतीय किसान खेत मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती होती. या आंदोलनामध्ये देशभरातून ४२ शेतकरी संघटनांचा सहभाग होता. शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण व्हावी. संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी सरकारवर ताशेरे ओढले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola