712 | पुणे | बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पुणे कृषी आयुक्तालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
गेल्या वर्षी कापसावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. याच नुकसानाची भरपाई देण्याचे आदेश पुण्यातील कृषी आयुक्तालयाने दिले आहेत. जवळपास २१० कोटी रुपयांची नुकसान भरपाई बियाणे कंपन्यांना द्यावी लागणार आहे. राज्यातील ३ लाख बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळालाय. याबाबतची महासुनावणी सध्या सुरु आहे.