शुभेंदू अधिकारी भाजपमध्ये जाण्याचं कारण काय? तृणमूलसाठी 23 वर्ष झटलेले शुभेंदू पक्ष सोडून का गेले?
एबीपी माझा वेब टीम | 03 May 2021 12:11 AM (IST)

WB Election 2021 : पश्चिम बंगाल निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार तृणमूल काँग्रेसने विजयी आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेसला येथे स्पष्ट बहुमत दिसत आहे. मात्र तरीही या विजयाचा आनंद साजरा करायचा की नाही या द्विधा मनस्थितीत तृणमूलचे कार्यकर्ते आहेत. कारण तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना नंदिग्राममध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत ममता बॅनर्जी यांचा शुभेन्दु अधिकारी यांच्याकडून 1953 मतांनी पराभव झाला आहे.