Solapur | महाराष्ट्रातला ऊस उत्पादक कर्नाटककडे का वळतोय? राज्यातील कारखान्यांकडे का फिरवली पाठ?
एबीपी माझा वेब टीम | 10 Dec 2020 10:51 PM (IST)

राज्यात ऊस दराचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. हंगाम सुरू होऊन महिना होत असला तरी राज्यातील अनेक कारखान्यांचे एफआऱपी जाहिर झालेले नाहीत. दरवर्षी उसाच्या दरावरुन राज्यात आंदोलन, मोर्चे होताना आपल्याला पाहायला मिळतात. ऊस गेल्यानंतर वर्षभर बिल जमा न झाल्याच्या तक्रारी देखील अनेकवेळा आपण ऐकल्या आहेत. अशाच कारणामुळे महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील ऊस उत्पादक शेतकरी कर्नाटकातील कारखान्यात गेल्या कित्येक वर्षांपासून ऊस पाठवत आहेत. राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आपलं राज्य सोडून कर्नाटकात ऊस पाठवण्याची नेमकी कारणं काय आहेत.