Farmer Protest | आंदोलनाच्या बाराव्या दिवशी काय काय घडामोडी घडल्या? शेतकरी आंदोलनाचे वेगवेगळे रंग
एबीपी माझा वेब टीम | 08 Dec 2020 02:48 AM (IST)

नवी दिल्ली : शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंद पुकारला आहे. भारत बंद दरम्यान शांततेत निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांच्या वतीने सातत्याने सांगितले जात आहे. काँग्रेससह देशभरातील 11 राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्य व केंद्रशासित प्रदेशांना नियमावली पाठवण्यात आली आहे.