भारतातील कोरोना स्थिती भयावह, लॉकडाऊन लावणं गरजेचं : अमेरिकेचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थनी फाऊची
एबीपी माझा वेब टीम | 01 May 2021 08:54 PM (IST)
नवी दिल्ली: भारतामध्ये येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाची स्थिती भयानक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे लवकरात लवकर लॉकडाऊन लावणं गरजेचं आहे असं मत डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी व्यक्त केलंय. डॉ. अॅन्थनी फाऊची हे अमेरिकेच्या बायडन प्रशासनातील वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार आहेत. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला त्यांनी मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं.