किसान मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांचा सहभाग, कसारा घाटात ताकदीचं प्रदर्शन | Special Report
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jan 2021 11:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चानं मुंबईकडे कूच केली आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. 26 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर मोर्चा धडकणार आहे. केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 60दिवसांपासून दिल्लींच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आहे.