Special Report | सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेतलं नसतं तर...
एबीपी माझा वेबटीम | 15 Mar 2021 11:49 PM (IST)

मनसुख हिरण मृत्यू प्रकरणात एकीकडे सचिन वाझेंचे पाय खोलात जात असतानाच त्यांच्यावर आखणी एका प्रकरणात आरोप झालाय. खरंतर प्रकरण तसं २००२ सालचं आहे.मात्र त्या प्रकरणाचा लढा अजूनही सुरु आहे. २००२ साली झालेल्या घाटकोपर ब्लास्टनंतर सचिन वाझेंना पहिल्यांदा पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं. मात्र १३ वर्षानंतर त्यांना पुन्हा एकदा सेवेत घेतलं गेलं. आणि त्यामुळेच मनसुख हिरण यांच्या कुटुंबावर ही वेळ आली असा आरोप होतोय.आणि तो आरोप केलाय आसिया बेगम या महिलेनं. या आसिया बेगम नेमक्या कोण आहेत? त्यांचा २००२ च्या बॉम्बस्फोटाशी काय संबंध? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून