History of Cyclone : या वादळांनी माजवला होता हाहाकार! कटू आठवणीतील वादळं...फयान, निसर्ग...
एबीपी माझा वेब टीम | 16 May 2021 12:17 AM (IST)

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोव्यात मासेमारांना अलर्ट केले आहे. हे वादळ गोव्यापासून 350 किलोमीटर अंतरावर आहे. 24 तासात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत येईल. चक्रीवादळ तयार झाल्यानंतर ते किनारपट्टीपासून 350-400 किमी दूर असेल. सर्वाधिक परिणाम सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला जाणवेल. ताशी 60 ते 70 प्रति वेग असलेल्या वाऱ्यामुळे कोकण आणि गोव्यातील झाडे तसंच कच्च्या घरांची पडझड होईल. 16 तारखेला रायगड, मुंबई, पालघर, ठाणे या ठिकाणी परिणाम जाणवतील. तोक्ते चक्रीवादळ 18 तारखेला विरावळ/पोरबंदर ते नलिया या गुजरातमधील किनारपट्ट्यांमध्ये धडकेल, अशी माहिती डॉ. भुते यांनी दिली.