Special Report | अधिकाऱ्यांच्या दिमतीला उद्योगपतींचा कार; नक्की चालवतय कोण राज्यातलं सरकार?
एबीपी माझा वेब टीम | 17 Feb 2021 11:40 PM (IST)

राज्य सरकारचे ८ प्रशासकीय अधिकारी एका बड्या उद्योजकाच्या गाड्या खाजगी आणि सरकारी कामासाठी वापरत असल्याची तक्रार बड्या मंत्र्यांनं मुख्यमंत्र्यांकडे केल्यानं खळबळ उडाली आहे. याबाबतचं वृत्त एबीपी माझानं दाखवल्यानंतर भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलंय. सरकारला अधिकारी जुमानत नाहीत, उद्योजक सरकार चालवत आहेत, अशी घणाघाती टीका भाजप नेते आशिष शेलारांनी केलीय.