देशमुख बहाणा, मुख्यमंत्री ठाकरे निशाणा? उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह
एबीपी माझा वेब टीम | 06 Apr 2021 01:06 AM (IST)

मुंबई : मुंबई पोलिसांवरील दबाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिले आहेत. आता सीबीआय चौकशी होईपर्यंत आता राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यातील हप्तेखोरीला उच्च न्यायालयाच्या निर्णयाने आळा बसेल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.