शेलारांचा एकाला कौतुकाचा हार, तिघांवर वार? आशिष शेलारांचा रोख नेमका कुणावर? स्पेशल रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम | 20 Nov 2020 11:09 PM (IST)
आशिष शेलार यांच्या या विधानाचा रोख सुप्रिया सुळे यांच्याच दिशेने होता,अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. हे वक्तव्य करून आशिष शेलार यांनी एका दगडात तीन पक्षी मारल्याची पण चर्चा आहे. सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या विषयाने अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अस्वस्थता वाढवण्याची खेळी या निमित्ताने आशिष शेलार यांनी केली . इतकच नाही तर आपल्या पक्षातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेलाही छेद दिलाय अशी चर्चा सुरू झाली.