कोलकाता : ईडन गार्डन्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली पहिल्याच चेंडूत शून्यावर बाद झाला. यानंतर विराटला राग अनावर झाला. त्याने सामनाधिकाऱ्याला बोलावून चांगलंच सुनावलं.

कोलकात्याविरुद्ध झालेल्या या साम्यात बंगळुरुला 82 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे बंगळुरुचा एकही गोलंदाज दोन अंकी धावसंख्या उभारु शकला नाही. सर्व संघ 49 धावांवर गारद झाला.

फलंदाजी करत असताना एका प्रेक्षकामुळे विराटचं लक्ष विचलित झालं आणि काल्टरच्या चेंडूवर तो बाद झाला. बाद झाल्यानंर पॅव्हेलियनमध्ये जाताच त्याने सामनाधिकाऱ्याला बोलावलं आणि त्या प्रेक्षकाविषयी जाब विचारला.

पाहा व्हिडिओ :