रहाणे-कराटे, अश्विन-इंजिनिअर टीम इंडियाच्या खेळाडूंबद्दल हे माहित आहे का?
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार आणि स्टार खेळाडू विराट कोहली त्याच्या उत्तम प्रदर्शनामुळे क्रिकेटप्रेमींच्या गळ्याचा ताईत बनला आहे. पण क्रिकेटच्या मैदानावर उतरताना, त्याचा लकी काळा बेल्ट बांधल्याशिवाय तो मैदानावर उतरत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोहित शर्माने ऑफ स्पिनर म्हणून आपली कारकीर्द सुरु केली. पण त्याचे फलंदाजीचे कसब पाहून प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्याला फलंदाजीसाठी प्रोत्साहित केले. आज भारतीय क्रिकेटमध्ये त्याला 'हिटमॅन' म्हणून ओळखले जाते.
अजिंक्य रहाणे हा लहानपणी कराटेचा ब्लॅक बेल्ट चॅम्पियन होता.
टी-20 सामन्यावेळी नवे विक्रम नोंदवणारा कन्नुर लोकेश राहुल उर्फ केएल राहुलला विराट कोहलीप्रमाणेच टॉटूची आवड आहे. त्याने आपल्या शहरावर तब्बल 7 टॅटू गोंदवले आहेत.
रवींद्र जडेजाला घोड्यांची प्रचंड आवड आहे. त्याने आपल्या जामनगरच्या फार्म हाऊसवर अनेक घोडयांना सांभाळले आहे.
भारतीय टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीला सैन्य दलाच्यावतीने 2011साली लेफ्टनंट कर्नल या पदाने गौरवण्यात आले आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम नोंदवणारा रविचंद्रन अश्विनने चेन्नईच्या एसएनएन इंजिनिअरिंग कॉलेजमधून आयटीमधून बीटेक केले. यानंतर आयटीमधील सुप्रसिद्ध अशा कॉग्निझंट या कंपनीत काहीकाळ नोकरीही केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -