घरात शेर आणि परदेशात ढेर ही टीम इंडियावरची टीका खोडून काढण्याचा आपला आणि आपल्या सहकाऱ्यांचा निर्धार असल्याचं जाडेजानं सांगितलं.
भारतीय संघाने 2016 या वर्षात अकरापैकी आठ कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. 2014 सालच्या सर्वाधिक आठ कसोटी सामने जिंकण्याच्या टीम इंडियाच्या विक्रमाची विराट कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांनी यंदा बरोबरी साधली.
विशेष म्हणजे 2014 साली भारतीय संघाने चौदा कसोटी सामन्यांमध्ये खेळून त्यात आठ विजय, तीन पराभव आणि तीन अनिर्णीत अशी कामगिरी बजावली होती.