यंदाच्या मोसमात अश्विनच्या नावावर मायदेशातल्या दहा कसोटींमध्ये 64 विकेट्स जमा झाल्या आहे. त्याने कपिल देव यांचा 37 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला.
कपिल देव यांनी 1979-80च्या मोसमात भारतातील 13 कसोटींमध्ये सर्वाधिक 63 विकेट्स काढल्या होत्या.
अश्विनने तो विक्रम मोडला आहेच, पण विशेष म्हणजे त्याने कारकीर्दीत दुसऱ्यांदा मायदेशातील कसोटी सामन्यात साठहून अधिक विकेट्स काढल्या आहेत. याआधी 2012-13 या मोसमात अश्विनने भारतातील 10 कसोटी सामन्यांमध्ये 61 विकेट्स काढल्या होत्या.