PM Modi Meets Badminton Players : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने काही दिवसांपूर्वीच महान बॅडमिंटन स्पर्धा थॉमस कपमध्ये (Thomas Cup 2022) विजय मिळवला. 73 वर्षात पहिल्यांदाच भारतानं मिळवलेल्या या विजयानंतर संपूर्ण संघाचं देशभरात कौतुक होत होतं. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंची भेट घेतली आहे. त्यांनी सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं. तर लक्ष्य याने अल्मोडाची प्रसिद्ध 'बाल मिठाई' मोदींना भेट म्हणून दिली.


यावेळी पीएम मोदी म्हणाले, 'हो आम्ही करु शकतो, हा विचारच आपल्या देशाची नवीन ताकद बनला आहे. मी तुम्हाला विश्वास देतो की सरकार सर्व खेळाडूंना शक्यती सारी मदत करेल. मी संपूर्ण देशाकडून संपूर्ण बॅडमिंटन संघाचं अभिनंदन करतो. ही कामगिरी कोणती छोटी कामगिरी नसून एक मोठी गोष्ट आहे.'


भारताचा ऐतिहासिक विजय


आतापर्यंत सर्वाधिक 14 वेळा इंडोनेशियाने, 10 वेळा चीनने, मलेशियाने 5 वेळा तर जपान आणि डेन्मार्क यांनी एक-एक वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. ज्यानंतर यंदा 2022 साली भारताने या स्पर्धेत चॅम्पियन इंडोनेशियाला मात देत पहिलं वहिला चषक मिळवला आहे. त्यामुळे ही स्पर्धा जिंकणार भारत जगातील सहावा देश बनला आहे. यंदा भारतीय बॅडमिंटन संघाने सुरुवातीपासून अप्रतिम कामगिरी सुरु ठेवली. त्यांनी आधी डेन्मार्कला सेमीफायनलमध्ये मात दिल्यानंतर अंतिम सामन्यात इंडोनेशियाला सुरुवातीच्या तीन सामन्यात मात दिली.


यावेळी सर्वात आधी स्पर्धेतील पहिला सामना पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने (Lakshya Sen) जिंकला. त्याने इंडोनेशियाच्या अँथॉनी गिंटिंगचा 8-21, 21-17 आणि 21-16 असा पराभव केला. त्यानंतर पुरुष दुहेरी सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने इंडोनेशियाच्या मुहम्मद एहसान आणि केविन संजया यांना 18-21, 23-21, 21-19, अशा फरकाने मात दिली. ज्यानंतर तिसऱ्या सामन्यात किंदम्बी श्रीकांतने (kidambi srikanth) इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीला 21-15, 22-21 च्या फरकाने मात देत सामना आणि कप भारताच्या नावे केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या