औरंगाबादमध्ये झालेल्या या सामन्यात जेमिमानं 163 चेंडूंमध्ये नाबाद 202 धावांची खेळी उभारली. तिच्या या द्विशतकाला 20 चौकारांचा साज होता. जेमिमानं 52 चेंडूंमध्ये अर्धशतक, तर 83 चेंडूंमध्ये शतकाचा टप्पा पार केला.
जेमिमाने 116 चेंडूंत दीडशे धावांचा टप्पा ओलांडला होता. जेमिमाच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईनं 347 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर सौराष्ट्रचा डाव 62 धावात गुंडाळून मुंबईनं 285 धावांनी विजय साजरा केला.