आयपीएल मुंबई-पुण्यातच हवं, एमसीएची सुप्रीम कोर्टात धाव
एबीपी माझा वेब टीम | 22 Apr 2016 12:56 PM (IST)
मुंबई : आयपीएलचे सामने मुंबई-पुण्यातच खेळवले जावेत यासाठी मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे 1 मे नंतरचे सामने मुंबई-पुण्यात खेळवले जाणार की नाही? याचा फैसला आता सुप्रीम कोर्ट करणार आहे. महाराष्ट्रात पाण्याची टंचाई असताना खेळपट्टी तयार करण्यासाठी लाखो लीटर पाण्याची नासाडी होते, त्यामुळे आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर व्हावेत, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयापुढे आली होती. घझथ उच्च न्यायालयानेही याचिकेत तथ्य असल्याचं नमूद केलं आणि 30 एप्रिलनंतरचे महाराष्ट्रातील नियोजित सामने इतर राज्यात खेळवण्याचे आदेश दिले. याच निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं आहे.