काही दिवसांपूर्वीच व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अजित आगरकर यांच्यासह काही माजी खेळाडूंनी धोनीच्या टी-20 करिअरबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
'धोनीवर टीका करण्याआधी लोकांनी आपली कारकीर्द पाहायला हवी. धोनीमध्ये अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे.' असं शास्त्री यावेळी म्हणाला. तो कोलकातामध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलत होता.
'विकेटकिपर आणि फलंदाजीमधील त्याची चपळता वाखणण्याजोगी आहे. धोनी इतकं चपळ दुसरं कुणीही नाही. क्षेत्ररक्षणात सध्या भारतीय संघ अव्वल आहे.' असंही शास्त्री यावेळी म्हणाला.
दरम्यान, भारत आणि श्रीलंकेमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका होणार असून पहिली कसोटी 16 नोव्हेंबरपासून ईडन गार्डन्समध्ये रंगणार आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध भारत कशी कामगिरी करणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
संबंधित बातम्या :
धोनीवर काही लोक प्रचंड जळतात : रवी शास्त्री