बंगळुरू: कसोटी आणि वन डे सामन्यांच्या धर्तीवर आता ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्येही बिनचूक निर्णयासाठी डिसिजन रिव्ह्यू सिस्टिमचा वापर करणं ही काळाची गरज असल्याचं मत इंग्लंडचा प्रमुख फलंदाज ज्यो रूटनं व्यक्त केलं आहे. भारत-इंग्लंड संघांमधल्या नागपूरच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात ज्यो रूटला बाद ठरवण्याचा पंच शमसुद्दिन यांचा निर्णय वादग्रस्त ठरला होता.
रुटला आऊट देण्यावर आक्षेप, अंपायरविरुद्ध इंग्लंडची तक्रार
त्या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी सहा चेंडूंवर केवळ आठ धावांची आवश्यकता असताना, जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर पंच शमसुद्दिन यांनी ज्यो रूटला पायचीट ठरवलं होतं. प्रत्यक्षात त्या वेळी चेंडू बॅटची कड घेऊन रूटच्या पॅडवर आदळला होता. पण शमसुद्दिन यांनी रूटला बाद ठरवलं आणि सामन्याला भारताच्या बाजूनं कलाटणी मिळाली. संबंधित बातम्या
VIDEO: रैनाचा सुपर कॅच
चहल हिरो, टीम इंडियाचा इंग्लंडवर 75 धावांनी विजय!
चहल 6 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज!
8 धावात 8 विकेट, क्रिकेटचा 71 वर्षांचा इतिहास पुसला!
तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पणातच मालिका खिशात, नाम है कोहली!
रुटला आऊट देण्यावर आक्षेप, अंपायरविरुद्ध इंग्लंडची तक्रार