बुमराचे शेवटचे सहा बॉल, ज्यामुळे हिरो बनला!
एबीपी माझा वेब टीम | 30 Jan 2017 08:10 AM (IST)
नागपूर : जसप्रीत बुमराच्या भेदक आणि टिच्चून गोलंदाजीमुळे भारताने दुसऱ्या टी ट्वेण्टी सामन्यात इंग्लंडचा 5 धावांनी पराभव केला. इंग्लंडचे भक्कम फलंदाज भारताचं 145 धावांचं तुटपुंजं लक्ष्य, सहज भेदतील असं वाटत होतं. मात्र आशिष नेहरा आणि जसप्रीत बुमराच्या अचूक गोलंदाजीमुळे इंग्लंडला ते अश्यक्य ठरलं. इंग्लंडला शेवटच्या सहा चेंडूंत विजयासाठी आठ धावांचीच आवश्यकता होती. पण जसप्रीत बुमरानं अखेरच्या षटकात कमाल केली. त्यानं धोकादायक ज्यो रुट आणि जोस बटलरचा काटा काढला आणि केवळ दोन धावा मोजून भारताला पाच धावांनी सनसनाटी विजय मिळवून दिला. बुमराहचे शेवटचे सहा बॉल, 8 धावांची गरज पहिला बॉल - ज्यो रुट एलबीडब्ल्यू आऊट दुसरा बॉल - मोईन अली - एक धाव तिसरा बॉल - बटलर - निर्धाव चौथा बॉल - बटलरच्या त्रिफळा पाचवा बॉल - 1 धाव सहा बॉल - एका चेंडूत सहा धावांची गरज, बुमराने मोईन अलीला चकवलं, निर्धाव, भारताचा पाच धावांनी सनसनाटी विजय