RCB Vs MI: IPL 2022: मुंबईनं सलग चौथा सामना गमावला

RCB Vs MI: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आठराव्या सामन्यात बंगळुरू आणि मुंबई (Royal Challengers bangalore Vs Mumbai Indians) यांच्यात लढत होणार आहे.

abp majha web team Last Updated: 09 Apr 2022 11:31 PM
मुंबईनं सलग चौथा सामना गमावला

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आठराव्या सामन्यात बंगळुरुच्या संघानं सात विकेट्स राखून मुंबईला पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर बंगळुरुच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघानं सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोदावर बंगळुरूसमोर 152 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या संघानं 9 चेंडू शिल्लक ठेवत हे लक्ष्य पूर्ण केलं. बंगळुरूच्या विजयात अनुज रावतनं महत्वाची भूमिका बजावली.


 

मुंबईविरुद्ध अनूज रावतची अर्धशतकी खेळी

मुंबईच्या संघानं दिलेल्या 152 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या संघानं आतापर्यंत चांगली खेळी केली. दरम्यान, या सामन्यात बंगळुरूचा फलंदाज अनूज रावत अर्धशतक ठोकून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं आहे. 


 

बंगळुरूची विजयाकडे वाटचाल, जिंकण्यासाठी 63 धावांची गरज

मुंबईनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या संघानं विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरु केली आहे. बंगळुरूनं 13 षटकात 92 धावा करून एक विकेट गमावली आहे. बंगळुरूला जिंकण्यासाठी 42 चेंडूत 60 धावांची गरज आहे. 

RCB Vs MI: मुंबईचं बंगळुरूसमोर 152 धावांचं लक्ष्य

पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडीअमवर (Maharashtra Cricket Association Stadium) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या सतराव्या सामन्यात मुंबईच्या संघानं बंगळुरूसमोर (RCB Vs MI) 152 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या सामन्यात नाणेफेक जिंकून बंगळुरूच्या संघानं मुंबईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबईच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 151 धावा केल्या. 


 

IPL 2022: सुर्यकुमार यादवचं संयमी अर्धशतक

बंगळुरुविरुद्ध मुंबईचा संघ संघर्ष करत असताना सुर्यकुमार यादवनं अर्धशतक ठोकलं आहे. 

IPL 2022: बंगळुरूच्या गोलंदाजासमोर मुंबईच्या फलंदाजांनी गुडघे टेकले

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबईच्या संघानं खराब कामगिरी केली. मुंबईच्या संघानं पंधरा षटकात 6 विकेट्स गमावून 91 धावा केल्या आहेत. 

IPL 2022: मुंबईची खराब खेळी, 62 धावांवर चार विकेट्स गमावले

आरसीबीविरुद्ध सामन्यात मुंबईच्या संघानं अतिशय निराशाजनक कामगिरी केली आहे. या सामन्यात मुंबईच्या संघान 10 षटकात चार विकेट्स गामवून 62 धावा केल्या आहेत. 

RCB Vs MI: मुंबईला पहिला झटका, रोहित शर्मा आऊट

बंगळुरूविरुद्ध सामन्यात मुंबईनं पहिला विकेट गमावला आहे. कर्णधार रोहित शर्मा आऊट झाला आहे.

TATA IPL:आरसीबी विरुद्ध मुंबईच्या सामन्याला सुरुवात

आरसीबी विरुद्ध मुंबईच्या सामन्यात सुरुवात झाली आहे. हा सामना पुण्याच्या महाराष्ट्र असोसिएशन क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. मुंबईच्या संघ या हंगामातील पहिला विजयाच्या शोधात मैदानात उतरली आहे. 


 

IPL 2022: बंगळुरूविरुद्ध सामना जिंकण्यासाठी मुंबईचे 11 खेळाडू मैदानात उतरणार

रोहित शर्मा (क), इशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, किरॉन पोलार्ड, रमणदीप सिंग, मुरुगन अश्विन, जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह, बेसिल थंपी

RCB Vs MI: बंगळुरूच्या 'या' 11 खेळाडूंचं मुंबईला आव्हान

फाफ डू प्लेसिस (क), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), डेव्हिड विली, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज

पार्श्वभूमी

RCB Vs MI: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आठराव्या सामन्यात बंगळुरू आणि मुंबई (Royal Challengers bangalore Vs Mumbai Indians) यांच्यात लढत होणार आहे. हा सामना पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर (Maharashtra Cricket Association Stadium) खेळला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाला सुरुवातीच्या तिन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. तर, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली बंगळुरूनं तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत. आजच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी मुंबईचा संघ मैदानात उतरणार आहे. तर, आपल्या खात्यात आणखी दोन गुण जमा करण्यासाठी बंगळुरूचा संघ संज्ज झालाय. 


आयपीएलमध्ये आजवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हे संघ तब्बल 29 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता मुंबईचं पारडं जड आहे. कारण मुंबईने 29 पैकी 17 सामने एकहाती जिंकत वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. तर आरसीबीला 12 सामन्यात विजय मिळवता आला आहे. पण यंदा बंगळुरुचा फॉर्म मुंबईपेक्षा अधिक चांगला असल्याने आजचा  सामना चुरशीचा होणार हे नक्की.


बंगळुरूचा संघ-
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अनुज रावत, विराट कोहली, शेरफेन रदरफोर्ड, शाहबाज अहमद, डेव्हिड विली, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा, ग्लेन मॅक्सवेल, सिद्धार्थ कौल, छमा व्ही मिलिंद, रजत पाटीदार, महिपाल लोमरोर, जेसन बेहरेनडॉर्फ, फिन ऍलन, सुयश प्रभुदेसाई, अनेश्वर गौतम.


मुंबईचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थंपी, जयदेव उनाडकट, फॅबियन अॅलन, अनमोलप्रीत सिंग, संजय यादव, रिले मेरेडिथ, रमणदीप सिंग, मयंक मार्कंडे, टिम डेव्हिड, आर्यन जुयाल, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, राहुल बुद्धी, अर्शद खान.


हे देखील वाचा-


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.