बंगळुरु कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच टीम इंडिया विजयरथावर स्वार
एबीपी माझा वेब टीम | 15 Jun 2018 06:03 PM (IST)
एकाच दिवसात दोनवेळा ऑल ऑऊट करण्याची कामगिरी केली. भारताकडून रविंद्र जाडेजानं दोन्ही डावांत मिळून सहा तर अश्विननं पाच फलंदाजांना माघारी धाडलं.
बंगळुरु : बंगळुरु कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच भारतानं अफगाणिस्तानचा एक डाव आणि 262 धावांनी धुव्वा उडवत विक्रमी विजय साजरा केला. धवन आणि मुरली विजयच्या शतकी खेळींमुळे भारतानं पहिल्या डावात 474 धावा उभारल्या. त्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजाच्या फिरकीच्या जोरावर अफगाणिस्तानं अक्षरश: लोटांगण घातलं. भारतानं अफगाणिस्तानचा पहिला डाव 109 धावांत गुंडाळला. 365 धावांची भली मोठी आघाडी मिळाल्यानंतर टीम इंडियानं अफगाणिस्तानवर फॉलोऑन लादला. पण फॉलोऑननंतर अफगाणिस्तान दुसऱा डाव 103 धावांत आटोपला. एकाच दिवसात दोनवेळा ऑल ऑऊट करण्याची कामगिरी केली. भारताकडून रविंद्र जाडेजानं दोन्ही डावांत मिळून सहा तर अश्विननं पाच फलंदाजांना माघारी धाडलं. संबंधित बातम्या : अफगाणिस्तानला 109 धावांत गुंडाळलं, फॉलोऑनची नामुष्की भारताचा पहिला डाव 474 धावांवर आटोपला