IND vs NZ Live Updates: तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला, न्यूझीलंडला विजयासाठी 400 धावांची गरज
India vs New Zealand 2nd Test: भारत आणि न्यूझीलँड दरम्यान आजपासून दुसरा आणि अखेरचा कसोटी वानखेडे स्टेडिअमवर सुरू आहे.
abp majha web teamLast Updated: 05 Dec 2021 05:26 PM

पार्श्वभूमी
India vs New Zealand 2nd Test: भारत आणि न्यूझीलँड दरम्यान आजपासून दुसरा आणि अखेरचा कसोटी वानखेडे स्टेडिअमवर सुरू होत आहे. मुंबईतील बदललेले वातावरण पाहता टीम इंडिया आपल्या संघात बदल करण्याची...More
India vs New Zealand 2nd Test: भारत आणि न्यूझीलँड दरम्यान आजपासून दुसरा आणि अखेरचा कसोटी वानखेडे स्टेडिअमवर सुरू होत आहे. मुंबईतील बदललेले वातावरण पाहता टीम इंडिया आपल्या संघात बदल करण्याची शक्यता आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट आहे. तब्बल पाच वर्षानंतर मुंबईत कसोटी सामना होणार आहे. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर स्टेडिअममध्ये क्षमतेच्या 25 टक्केच प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे. सामना सुरू उशिराने सुरू होणार. नाणेफेक 11.30 होणार असून दुपारी बारा वाजता सामना सुरू होणार आहे. विराट कोहलीचे कमबॅककानपूरमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे याने संघाचे नेतृत्व केले होते. भारतीय संघात विराट कोहलीचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे संघाची धुरा विराह कोहलीकडे जाणार आहे. तर, अजिंक्य रहाणे संघाचा उपकर्णधार असणार आहे. कोहलीशिवाय भारतीय संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यालाही संधी मिळू शकते. नवीन खेळाडूचे पदार्पणभारताचा यष्टिरक्षक वृद्धिमान साहा याने कानपूर कसोटीत दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले होते. मात्र, जखमी असल्याने त्याने यष्टिरक्षण केले नव्हते. त्याच्या ऐवजी के.एस. भरत याने दोन्ही डावात यष्टिरक्षण केले होते. त्याची कामगिरीही चांगली होती. त्यामुळे भारतीय संघाकडून आज के.एस. भरत पदार्पण करू शकतो. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संभाव्य टीम इंडिया: विराट कोहली (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, के. एस. भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.इतर महत्त्वाच्या बातम्या:Mumbai Women Cricket Scorer : मुंबई कसोटीत स्कोरिंगची सूत्रं 'ती'च्या हाती
न्यूझीलंडला विजयासाठी 400 धावांची गरज
तिसऱ्या दिवशीचा खेळ अखेर संपला आहे. दिवस अखेर न्यूझीलंडने 5 गडी गमावले असून त्यांनी 140 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. त्यांना विजयासाठी अजूनही 400 धावांची गरज आहे.