केदारला सांगितलं होतं, तू फक्त 150 पर्यंत साथ दे : कोहली
एबीपी माझा वेब टीम | 16 Jan 2017 11:08 AM (IST)
पुणे: इंग्लंडचं 351 धावांचं लक्ष्य पार करताना कोणती रणनिती वापरली, याबाबत कर्णधार विराट कोहलीने सांगितलं. इंग्लंडचं 351 धावांचं लक्ष्य पार करताना टीम इंडियाची अवस्था 4 बाद 63 अशी झाली होती. त्यावेळी केदार जाधव मैदानात आला. त्यावेळी आपल्याला 150 धावापर्यंत विकेट टिकवायची आहे. ते शक्य झाल्यास इंग्लंडचे खेळाडू आपोआप पॅनिक होतील, असं केदारला सांगितलं. मग केदारनेही उत्तम फलंदाजी करत, जोरदार फटकेबाजी केली, असं कोहलीने सांगितलं. आपण 150 धावांचा टप्पा ओलांडल्यास, इंग्लंडचे खेळाडू चिंताग्रस्त होतील. खेळपट्टी उत्तम आहे, त्यामुळे तू तुझे फटके खेळशील, असंही विराटने केदारला सांगितलं. मात्र केदारने खेळलेले काही फटके पाहून मी स्वत: अवाक् झालो. मी त्यावर विश्वासच ठेवू शकत नव्हतो. केदारसोबतची भागीदारी खूपच खास होती. त्यामुळे ती दीर्घकाळ लक्षात राहील, असंही कोहली म्हणाला.