नवी दिल्ली : टीम इंडियाच्या पाठीशी लागलेला दुखापतींचा ससेमिरा अजूनही काय आहे. सलामीवीर लोकेश राहुलपाठोपाठ आता युवा अष्टपैलू हार्दिक पंड्यालाही सरावादरम्यान गंभीर दुखापत झाली आहे.


हार्दिकच्या उजव्या खांद्यावर चेंडू आदळल्याने त्याला विश्रांतीसाठी घरी पाठवण्यात आलं आहे. डाव्या मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे मोहाली कसोटीतून माघार घेणारा लोकेश राहुल मुंबईतल्या चौथ्या कसोटीआधी तंदुरुस्त होईल, असा विश्वास बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात व्यक्त करण्यात आला आहे.

यापूर्वी देखील विकेटकीपर रिद्धीमान साहा दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. तर लोकेश राहुललाही विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या रुपाने टीम इंडियाचा दुखापतीचा ससेमिरा कायम दिसत आहे.